इंदापूरसंस्कृती

पोंधवडी “येथे 26 मार्चपासून “अखंड हरिनाम सप्ताह ला “सुरुवात!

Spread the love

भिगवण/प्रतिनिधी:-

पोंधवडी या ठिकाणी गेले चार वर्ष अखंड हरिनाम सप्ताह जोरदारपणे सुरू आहे याच गोष्टीला अनुसरून श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त चालु वर्षी अखंड हरिनाम सप्ताह चे जोरदार आयोजन वर्ष 5 वे केले आहे, गेले चार वर्ष सध्याच्या काळामध्ये खूप मोठ्या उत्सव या निमित्त पहावयास मिळाला आहे त्याचप्रमाणे गावातील नागरिकासह महिलाही सातत्याने खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रम अगदी शिस्तबद्ध होत असून, गावातील नागरिक या उत्सवाचे अगदी आतुरतेने वाट पाहतात, या हरिनाम सप्ताह चे आयोजन समस्थ ग्रामस्थ पोंधवडी यांच्या वतीने करण्यात येत आहे, त्याचप्रमाणे गावातील नागरिकांनी या निमित्त वैयक्तिकरित्या येणाऱ्या महाराजांसह भाविकांनाही महाप्रसादाचे आयोजन केलं आहे,
अखंड हरिनाम सप्ताह हा भक्ती, नामस्मरण, कीर्तन, भजन आणि समाजएकतेचा अतिशय पवित्र धार्मिक उत्सव आहे. या सप्ताहात सात दिवस अखंडपणे भगवान विठ्ठल, श्रीहरी, रामकृष्ण, दत्त, देवी-देवता यांच्या नामाचा जप केला जातो. त्यामुळे वातावरण भक्तिमय, पवित्र आणि आनंदमय बनते.

अखंड हरिनाम सप्ताहाचे महत्त्व

अखंड हरिनाम सप्ताहामुळे मन शुद्ध होते, श्रद्धा वाढते आणि भक्तीभाव दृढ होतो. नामस्मरणाने मनाला शांती मिळते, वाईट विचार दूर होतात आणि सदाचाराची प्रेरणा मिळते. गावात किंवा परिसरात सप्ताह भरल्याने लोक एकत्र येतात, सामूहिक प्रार्थना करतात आणि सामाजिक ऐक्य मजबूत होते.

सप्ताहात होणारे कार्यक्रम

या सप्ताहात काकड आरती, हरिपाठ, भजन, कीर्तन, प्रवचन, पालखी, दिंडी, भागवत वाचन, गवळण, जागरण, महाप्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रम होतात. संतांच्या अभंगांचे गायन, भारुड, तसेच समाजप्रबोधनाचे कार्यक्रमही घेतले जातात

आध्यात्मिक लाभ

हरिनामाचा जप हा आत्मशांतीचा सोपा मार्ग मानला जातो. “राम कृष्ण हरी”, “श्रीराम जय राम जय जय राम”, “विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल” अशा नामघोषाने भक्तांच्या मनात चैतन्य निर्माण होते. यामुळे भक्ताला देवाजवळ असल्याची अनुभूती येते.

सामाजिक महत्त्व

अखंड हरिनाम सप्ताह केवळ धार्मिक नसून सामाजिक दृष्ट्याही महत्त्वाचा आहे. यातून सेवाभाव, सहकार्य, शिस्त, स्वच्छता, दानधर्म आणि परस्पर प्रेम वाढते. याच गोष्टीला अनुसरून पोंधवडी या ठिकाणी 26 मार्च ते 1 एप्रिल सप्ताह होणार असून, यामध्ये कीर्तनकार , समाज प्रबोधन करणार असून गावातील नागरिकां सह आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान यात्रा कमिटी पोंधवडी यांच्या वतीने करण्यात आले आहे,.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *